दिनांक २६ मे २०२१ रोजी महासंग्राम द्वारे "वैचारिक बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली ."
महासंग्राम चे संस्थापक अध्यक्ष संग्राम संतोष सलगर [ INTERNATIONAL YOUTH LEADER ] तसेच आयोजक प्रितम चौरे यांनी वैचारिक बुद्ध पौर्णिमेचे आयोजन केले होते. कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ, आदरनीय, पूजनीय व्यक्तिमत्त्व तसेच समुहाचे सर्व सदस्य अगदी उत्स्फूर्तपणे सामिल झाले होते.
कार्यक्रमाच्या आरंभी "महासंग्राम" चे संस्थापक अध्यक्ष संग्राम सलगर सर तसेच प्रितम चौरे सर यांनी सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत केले व प्रमुख अतिथींचा अल्प परिचय करुन दिला. तसेच पूर्ण उपक्रमाची रूपरेखा व मार्गदर्शक तत्वे सांगीतली व उपक्रमास सुरुवात केली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संग्राम सलगर यांनी आजचा उपक्रम करण्या मागचा हेतू स्पष्ट केला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अशोक कांबळे [ B. COM, क्रांतीसूर्य महात्मा फुले पुस्तकार, SBI Worker, Mumbai ] आणि धनराज गमरे सर [ स्मृती राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्कार -२०२०, रायटर्स इंक अवॉर्ड -२०२१ ] यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुण्यांनी बुध्द पौर्णिमेबद्दल सखोल माहिती दिली. यावेळी बोलताना अशोक कांबळे सर म्हणाले " बुद्ध हे आचारात आणि विचारात असायला हवेत. " धनराज गमरे सर यांचंही मोलाचं मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्रीधर नंदीवाले सर, श्रध्दा चोबे मॅडम, आप्पासो शिंदे सर, स्वप्निल दाभाडे सर, उमेश गायकवाड सर, अर्पना माने मॅडम, अर्जुन जाधव सर, मंगेश कोळी सर ह्या सर्व प्रमुख उपस्थितींनी सहभागी होऊन सक्रिय सहभाग नोंदवावा. शेवटी अध्यक्ष संग्राम सलगर तसेच आयोजक प्रितम चौरे सर यांनी सर्व सदस्य, प्रमुख पाहुणे यांचे आभार मानून कार्यक्रमाल पूर्णविराम देऊन गौतम बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.